रविंद्रनाथ टागोर

आपल्या देशात अनेक महान व्यक्ती होऊन गेलया त्यापैकीच एक गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांना साही त्यातील पहिला नोबल पुरस्कार मिळाला .आज आपण त्याच महान व्यक्ती बद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

बालपण


रविंद्रनाथ टगोर यांचा जन्म ७मे१८६१मध्ये कोलकाता येथे झाला देवेद्रनाथ टागोर व सरला देवी या आई वडिलांच्या छत्राखाली रविंद्रनाथ यांचे बालपण गेले. कल्कात्याच्या पिराली ब्राह्मण कुटंबात जलमाला आल्याल्या रविंद्रनाथ ची आठव्या वर्षी पहिली कविता लिहिली व वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी भानुसिह हया टोपण नावाने कविता लिहिल.

रविंद्रनाथ टागोर यांचा जीवन प्रवास


कलकत्ता सोडल्यानंतर भ्रमन्ती मध्ये त्यांनी अनेक ठिकाणे पहिली .अमृतसर व डलहौसी या ठिकाणी अनेक व्यक्तीची आत्मचरित्र वाचली.
१८७०सली प्रकाशित रचनेमुळे रविंद्रनाथ प्रथम प्रसिद्ध झाले.

बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजात प्रवेश घेतला.

साहित्य

१९०५ साली नंतर त्यांच्या साहित्याची ओढ बं गाली व विदेशी वाचकांना लागली. १४ नोव्हेंबर १९१३साली त्यांनी स्वीडिश अकादमीचा पुरस्कारही मिळाला.
पुढे “गीतांजली”रचनेबदल मानाचा समजला जाणारा नोबल पुरस्कार मिळाला.

रविंद्रनाथ Tagor Gitanjali
रवीन्द्रनाथ टागोर यांची रचना गीतांजलि

रविंद्रनाथ टागोर यांचे उल्लेखनिय कार्य

भारतामध्ये सामाजिक राजकीय व सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख कैद्रापैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभावही रविंद्रनाथ यांच्यावर पडला होता.संत तुकाराम यांच्या साहित्याचा ही त्यांनी अभ्यास करून, काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केली.
रविंद्रनाथ यांची बंगाली साहित्याची माहिती घेऊन त्या प्रेरणेतून महाराष्ट्र भुषन व पू. ल.देशपांडे बंगाली शिकले.गीतांजली चे इंग्लिश भाषांतर ही रविद्रानाथ यांनीच केले.

अखेरची वर्षे (१९३२-१९४१)

जीवनाच्या शेवटची दशके रवींद्रनाथ यांनी जनमानसात बितवली . त्यांची लोकप्रियता देशात शिखरावर होती. १५-जानेवारी-१९३४ रोजी बिहारमध्ये झालेल्या भूकंपाची, महात्मा गांधींनी “दलित अत्याचाराचा परमेश्वराने घेतला सूड” अशी व्याख्या केली. या वक्तव्याचा रवींद्रनाथांनी निषेध केला. बंगालच्या आर्थिक व सामाजिक अवनतीबाबत व कलकत्यातील भीषण दरिद्राते बद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या दारिद्र्यावर केलेल्या मुक्तछंदातील १०० ओळींच्या कवितेचा प्रभाव सत्यजित रे यांच्या अपुर संसार ( अपूचे जग) या चित्रपटावरही पडलेला दिसतो.

पुनश्च (१९३२), शेष सप्तक (१९३५), पत्रपुत (१९३६) आदी गद्यपद्यांचा(prose-prose) समावेश असलेले स्वतःच्या लिखाणाचे १५ खंड संपादित केले. याशिवाय ‘चित्रांगदा’, श्यामा (१९३९), चंडालिका (१९३८) सारख्या नृत्य-नाटिकांवर विविध प्रयोग केले.याशिवाय दुई बोन (दोन बहिणी) (१९३३), मलंच (१९३४), and चार अध्याय (१९३४)आदी कादंबऱ्या लिहिल्या.

अखेरच्या काळात विज्ञानात रवींद्रनाथांनी विशेष रस घेतला. यातूनच त्यांच्या विश्वपरिचय या निबंधसंग्रहाची निर्मिती झाली. जीवशास्त्र, भौतिकी व खगोलशास्त्राचा त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कवितेवरही जाणवतो. त्यांच्या कवितेतून झळकणारा निसर्गवाद(naturalism) हा त्यांना वैज्ञानिक नियमांप्रती त्यांना असलेला आदर अधिरेखित करतो. विज्ञानाची प्रगती त्यांनी आपल्या विविध रचनांमधून मांडली आहे जसे से (तो) (१९३७),तीन संगी (१९४०), गल्पस्वल्प (१९४१)

संदर्भ:

  1. Wikipedia open source for knowledge.